काठापुर बुद्रुक मुख्य रस्त्याला अडसर ठरत असलेला विद्युत खांब काढण्याची मागणी


काठापुर बुद्रुक ता. आंबेगाव गावच्या मुख्य बाजारपेठ रस्त्याच्या मधोमध वाहतुकीला अडसर होत असलेला विद्युत खांब महावितरण कंपनीने काढून टाकावा. याबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी महावितरणचे अभियंता यांच्याकडे वारंवार मागणी करूनही उपयोग झाला नाही. त्यानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घोडेगाव येथे जनता दरबार भरविला होता या जनता दरबारामध्ये काठापुर ग्रामस्थांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना लेखी निवेदन दिले होते. मात्र पंधरा दिवस होऊन सुद्धा महावितरण कंपनीने अद्याप रस्त्याला अडचण ठरत असलेल्या विद्युत खांब न काढल्याने काठापुर बुद्रुक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. कामात हलगर्जी करणाऱ्या अभियंता व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी काठापुर ग्रामस्थ करत आहे.

काठापुर बुद्रुक येथे महावितरण व महापारेषन कंपनीचे स्टेशन आहे. या ठिकाणावरून परिसरातील अनेक सब स्टेशनला विज पुरवठा होतो.हा पुरवठा करत असताना काठापूर बुद्रुक या ठिकाणावरुण पेठ या ठिकाणी जाणाऱ्या वीजवाहक तारांचे खांब काठापूर बुद्रुक गावातील रस्त्याच्या मध्ये अनेक ठिकाणी उभे आहे. याबाबत ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने अनेक वेळा विजवितरण कंपनीकडे पाठपुरावा केला. परंतु यावर कार्यवाही झाली नाही. त्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी घोडेगाव या ठिकाणी तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भरवलेल्या जनता दरबारात हा प्रश्न ग्रामपंचायतीने उपस्थित केला. यावेळी संबंधित विभागाला वळसे पाटील यांनी सुचना केल्या आहेत मात्र अद्याप काम काढण्यात आला नाही. या ठिकाणावरून अनेक नागरिक रोजच ये जा करत असतात. परंतु हा विजेचा खांब रस्त्याच्या मध्येच असल्याने नागरिकांच्या जाण्यास अडथळा येत असून अपघाताचा धोका संभवतो. सदर रस्ता पूर्वी ८ ते १० फुटाचा होता त्यावेळी हा खांब या छोट्या रस्त्याच्या कडेला होता परंतु ग्रामपंचायतीने गावातील सर्वच सार्वजनिक रस्त्यांची मोजणी करून अनेक रस्ते मोकळे केली आहे.त्यामुळे या रस्त्याची रुंदी २५ फूट झाली आहे.त्यामुळे अनेक खांब रस्त्याच्या मध्येच येत आहेत. त्यामुळे अडथळा ठरणारे खांब काढावे हि अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.