अर्धवट असलेल्या पुलाचे काम कधी होणार ? स्थानिक ग्रामस्थांचा सवाल
लाखणगाव (ता.आंबेगाव) या ठिकाणी बेल्हा-जेजुरी या राज्य मार्गावर घोड नदीवरील पुलावर झालेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली असून गेली अनेक महीने या ठिकाणी नवीन पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने जुना पुल वापरावा लागत असून त्याचा फटका वारंवार वाहतुकीस होत असुन.हा पुल कधी पुर्ण होणार याबाबत प्रश्न ग्रामस्थ व वाहतूक वाहनचालक विचारत आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव या ठिकाणावरून बेल्हा जेजुरी राज्यमार्ग जातो.हा राज्यमार्ग सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक या मार्गावरून होत असते.या महामार्गावर लाखणगाव या ठिकाणी घोड नदीवर नवीन पुल मंजूर झाला असून.या पुलाचे काम मागील अनेक महिन्यांपासून रखडले आहे.अर्धवट असलेल्या या पुलामुळे लाखणगाव या ठिकाणी जुन्या पुलावरून वाहतूक होत असते.जुना पूल कमी उंचीचा व कमी रुंदीचा आहे व एका बाजूला रस्त्याला मोठ्या प्रमाणात वळण आहे.त्यामुळे या ठिकाणी अपघात होत असतात. या आधीही या पुलावर अनेक वेळा अपघात होऊन वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून घोड नदीचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होते. मागे अनेक वर्षांपासून बेल्हा जेजुरी राज्यमार्ग सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे.परंतु लाखणगाव या ठिकाणी असणारा पुल अपूर्ण असल्याने मोठ्या प्रमाणावर मनस्ताप होत आहे.त्यामुळे हा पूल लवकरात पूर्ण व्हावा अशी मागणी माझी सरपंच प्राजक्ता रोडे पाटील यांनी केली आहे.
या आधीही पुला बाबत अनेक वेळा प्रशासकीय अधिकारी व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला जात असून.हा अपूर्ण पुल कधी पुर्ण होणार व मोठ्या प्रमाणावर होणारी गैरसोय कधी थांबणार याबाबत प्रश्नचिन्ह नागरिकांमध्ये आहे. रविवार ( दि.२७) रोजी मध्य रात्रीच्या वेळी झालेल्या अपघातामध्ये मालवाहतूक ट्रक पुलाच्या कठड्याला धडकल्याने पुलावरील वाहतुक बंद झाली आहे.त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी आंबेगाव तालुका प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष सतिश रोडे पाटील, सरपंच प्राजक्त रोडे पाटील, माजी सरपंच दस्तगीर मुजावर, ग्रामस्थ व वाहन चालकांनी केली आहे.________________________