शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व शासकीय अडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करु – माजी मंत्री दिलीप वळसे पाटील


कायमच दुष्काळ ग्रस्त असणाऱ्या धामणी ता.आंबेगाव गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीसाठी पाणी योजना सुरू केल्या आहेत.यापुढेच्या काळात शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व शासकीय अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.पाणी योजनांसाठी ट्रांसफार्मर व शासकीय अडचणी दूर केल्या जातील अशी माहिती माझी सहकार मंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दत्तात्रयनगर या ठिकाणी धामणी व पहाडदरा परिसरातील शेतकरी व वळसे पाटील यांची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. वळसे पाटील यावेळी म्हणाले की धामणी तालुका आंबेगाव येथील शेतकऱ्यांनी डिंभा उजव्या कालव्यावरून सुरू केलेल्या पाणी योजनांचा फायदा धामणीच्या शेतकऱ्यांना होणारा असून या योजना पूर्ण झाल्यानंतर या योजनांसाठी ट्रांसफार्मर आमदार निधीतुन उपलब्ध केले जातील. तसेच वन विभाग पाटबंधारे विभाग यांच्या माध्यमातून येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल धामणी शेतकऱ्यांच्या योजनांना कोणते शासकीय अडचणी येणार नाही याची काळजी घेतली जाईल यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेमध्ये माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, रवींद्र करंजखेले,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,धामणीच्या सरपंच रेश्मा बोराडे, बाळशीराम वाळुंज यांसह धामणी व पहाडदरा येथील शेतकरी उपस्थित होते. यापूर्वी धामणी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चार ऊपसा सिंचन योजना केल्या असून. सध्या आठ उपसा सिंचन योजना प्रगतीपथावर असून. अजून एक दोन उपसा सिंचन योजना होणार आहेत. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून धामणी व पहाडदरा येथील शेकडो एकर शेती ओलिताखाली येणार आहे. त्याचप्रमाणे कायमच दुष्काळाची झळा सोसणारे धामणी गाव दुष्काळ मुक्त होणार आहे. त्यामुळे यासाठी येथून पुढच्या कालखंडामध्ये या दोन गावांना मोठा फायदा या पाण्याचा होणारा आहे.