मांदळेवाडी येथे श्री हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मासवडी भाकरीचा महाप्रसाद


मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे श्री हनुमान मंदिराच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवार ( दिः२४) ते गुरूवार (दिः०१मे) अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन केले जाते.चालू वर्षी या सप्ताहचे ३१ वे वर्षे असून,दररोज हरिकिर्तनानंतर महाप्रसाद दिला जातो.चालू वर्षी सप्ताहाच्या चवथ्या दिवशी ग्रामस्थांच्या माध्यमातूनच जवळ-जवळ १२००/ ग्रामस्थांना बाजरीची भाकरी व मासवडी जेवनाचे आयोजन केले होते. जवळ-जवळ १५०० बाजरीची भाकरी व मासवडीचे जेवन ग्रामस्थांना दिले गेले.तसे पाहिले तर हे गाव पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.दुष्काळग्रस्त गाव म्हणून या गावाची ओळख आहे.पण म्हणता ना ” एकी हेच बळ ” या माध्यमातून आपल्या गावाप्रती असणारी अस्था आणि निष्ठा या गावाने दाखवून दिली आहे.आंबेगाव तालुक्यातच नाही तर संपूर्ण उत्तर पूणे जिल्हयात एक आदर्श अखंड हरिनाम सप्ताह म्हणून या गावाला ओळखले जाते.