धामणी गाव होणार पाणीदार ; शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केले पाईपलाईनचे काम


धामणीची ‘ शेतताळ्याचे गाव ‘ म्हणून ओळख निर्माण होणार आहे.

धामणी (ता.आंबेगाव ) हे दुष्काळी गाव म्हणून ओळख असणार्या या गावातील नागरीकांनी एकत्र येत गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे.गावातील धनगरदरा, चाडदरा,करंजखेले मळा,गाढवे मळा,बोऱ्हाडे मळा,रोडे मळा, टेकाडे मळा,माळीमळा, हिवरकर मळा,गवंडी मळा, भगत मळा आणि द्रौणागिरी मळ यातील शेतकर्यांनी एकत्र येत दुष्काळवर मात करण्यासाठी कंबर कसली आहे. यामध्ये धनगरधरा व करंजखेले मळा या शेतकर्यांनी एकत्र येत या आधि पाईप लाईन केली आहे. तर उर्वरीत मळ्यातील आठ पाईप लाइनचे काम प्रगतिपथावर असून लवकरच ते काम पूर्ण होऊन पाणी शेतात जाईल. यासाठी काही शेतकर्यांनी शेततळी तयार केली असून या तळ्यांमध्ये लाखो लीटर पाणी साठवले जाईल.याचा उपयोग उन्हाळ्यातही पिकांसाठी होईल.तर काही शेतकर्यांनी एकत्र येत कोणत्याही शासकीय मदतीशिवाय डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावर सामूहिक सिंचन योजना राबवून शेकडो एकर जमीन ओलिताखाली आणून जलक्रांती घडविण्याचा ध्यास घेतला आहे.त्यामुळे धामणीची ‘ शेतताळ्याचे गाव ‘ म्हणून ओळख निर्माण होणार आहे.

धामणी गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे चहूबाजूनी डोंगर असून सुद्धा पंरपरागत दुष्काळी गाव म्हणून ओळख असणारे गाव आता बागायत होणार यात शंका नाही. यासाठी वरील मळ्यातील शेतकरी एकत्र येत डिंभा उजव्या कालव्या वरून पाईप लाईन करण्याचा ध्यास घेतला व हा ध्यास पूर्णत्वाकडे जाऊन लवकरच शेतात पाणी खेळेल असे येथील शेतकर्यांनी सांगितले. या जलक्रांती साठी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवजिराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे माजी सदस्य रविंद्र करंजखेले, माजी सरपंच सागर जाधव, सरपंच रेश्मा बोर्हाडे, उपसरपंच अक्षय विधाटे,माजी सरपंच अंकूश भूमकर,ग्राम पंचायत सदस्य प्रतिक जाधव, वामन जाधव इतर सर्व मळ्यातील शेतकर्यांनी हे पाईप लाईनचे शिवधनुष्य उचलून शोतात पाणी आणायचे हे नक्की केले व लवकरच त्यांच्या प्रयत्नांना यश येणार हे मात्र नक्की. लवकरच पहाडधरा येथे ही शेतकर्यांना एकत्र करून डिंभे उजव्या कालव्यावरून पाईप लाईनचे काम सुरू करणार असल्याचे सरपंच मच्छिंद्र वाघ व उपसरपंच कैलास वाघ यांनी सांगितले